औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील मणुर येथे शेतातून मोल-मजुरी करुन घरी परतताना दोन महिलांना टेम्पोने चिरडल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला आहे. ठगनबाई विश्वनाथ दवंगे (वय ५६), मंगल आसाराम दवंगे (वय ३८) अशी या दोघी चुलती पुतनीची नावे आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मंगल दवंगे आणि ठगनबाई दवंगे या दोघी शेतातून मोल मजुरी करुन घरी पायी परतत असताना साकेगावकडून मणुरकडे येणाऱ्या टेम्पोने या दोघींना जोराची धडक दिली. या अपघातात दोघी चुलती पुतनीचा टेम्पोखाली चिरडून जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर चालकाने आपले वाहन जागेवर सोडुन पळ काढला. तसेच घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिऊर पोलीस दाखल झाले आहेत.