मुंबई : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. त्यानंतर खातेवाटपही झाली. मात्र या खातेवाटपावरून शिंदे गटातील मंत्री नाराज असल्याच्या चर्चा आहे. कारण, शिंदे गटाच्या तुलनेत भाजपला चांगली खाती मिळाली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, खातेवाटपाच्या नाराजीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले.
याच पार्श्वभूमीवर खातेवाटपावरून कुणीच नाराज नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मंत्र्यांना ज्या खात्याची जबाबदारी दिली आहे ती यशस्वीरित्या पार पाडतील. मंत्री हा एका मतदार संघापुरता मर्यादित नसतो, तर त्याच्याकडे राज्याचा कारभार असतो. त्यामुळे सर्वांगीण विकास कसा होईल याकडे कल असणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. याशिवाय सर्वसामान्यांना न्याय मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
तसेच, एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्यांना ज्या खात्याची जबाबदारी दिली आहे ती यशस्वीरित्या पार पाडतील. मंत्री हा एका मतदार संघापुरता मर्यादित नसतो तर त्याच्याकडे राज्याचा कारभार असतो. त्यामुळे सर्वांगीण विकास कसा होईल याकडे कल असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.सर्वसामान्यांना न्याय मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.