नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,299 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,26,879 लोकांना जीव गमवावा लागला आहे. अशातच आता दिल्लीमध्ये सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा मास्क सक्ती लागू कऱण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास 500 रुपयांचा दंड बसणार आहे.
तसेच खासगी चारचाकी गाडीने जर प्रवास करत असाल तर मास्क न घातल्यास दंड आकारला जाणार नाही असे म्हटले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. नियमावलीचे पालन करा असे प्रशासनाच्या वतीने सांगतण्यात येत आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांत 2146 रुग्ण आढळले आहेत. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, दिल्लीमध्ये ओमायक्रॉनच्या BA.2 आणि BA.5 चे सब व्हेरिएंट सापडले आहे. त्यामुळे वेगाने रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती समोर येत आहे.