अहमदनगर: अहमदनगर पोलिस परेड ग्राऊंडवर ध्वजारोहण झाल्यानंतर बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागील काळात महसूल विभागामध्ये काय घडलं आहे याची चौकशी करावी लागेल. मात्र, येणाऱ्या काळामध्ये पूर्वीसारखे आरोप होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे असेही विखे पाटील म्हणाले.
तर महसुल मंत्र्याच्या याच वक्तव्यावरती माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. थोरात म्हणाले, नगर जिल्ह्याला यापूर्वी नेहमी कृषीमंत्रीपद असायचं. यावेळी महसूलपद पुन्हा आलं याचा मला आनंद आहे. चांगलं काम करावे हिच अपेक्षा आहे.
ते काय बोलले असतील ते बोलले असतील, त्यांना काय कर्तृत्व दाखवायाच ते दाखवावं आता ते महसूल मंत्री झालेले आहेत. त्यांच्या विभागाचं काय करायचं कोणती चौकशी लावायची तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी जरूर काय असेल त्या चौकशा कराव्यात. शेवटी जनतेच्या हिताच्या गोष्टी त्यांनी कराव्या, थोडा काळ मिळाला आहेअसे त्यांनी वक्तव्य केले.