नवी दिल्ली: आता भारत चीनी मोबाईलवर बंदी आणण्याच्या तयारीत असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. भारताकडून चीनी मोबाईलवर बंदी आणण्याचा विचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान, असे झाल्यास चीन आणि चीनी कंपन्यांना मोठा धक्का बसणार आहे. भारत 12 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या चीनी मोबाईलवर बंदी आणण्याच्या तयारी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, भारत सरकारने यापूर्वीच देशातील शाओमी आणि ओप्पो आणि विवो सारख्या चिनी कंपन्यांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप लावले आहेत. मोबाईल उद्योगात भारतीय कंपन्यांचा वाटा 50 टक्क्यांहूनही कमी आहे. त्यामुळे भारतीय मोबाईल कंपन्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देत त्यांना जागतिक बाजारात समाविष्ट करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून भारत आगामी काळीत चीनी कंपन्यांच्या मोबाईलवर बंदी आणण्याची शक्यता आहे.