नागपूर - एकनाथ शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेवर मोठे पक्ष संकट उभ राहिले आहे. या संकटसमयी संभाजी ब्रिगेडने शिवसेनेला पाठिंबा दर्शविला आहे. यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रितिक्रिया दिली आहे.
शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत केलेली युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.
तसेच, यावर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार? एकनाथ शिंदे गट की उद्धव ठकरे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, जे नियमात आहे ते होईल, नियमांच्या बाहेर या सरकार मध्ये काहीच होणार नाही असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, नागपूरमध्ये ते बोलत होते.