मुंबई: महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याने आता मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात मंत्र्यांअभावी अनेक विभागांच्या कामांवर परिणाम होत असून, त्यामुळे अनेक विकासकामे रखडली आहेत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक महिना होऊन गेला पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. आता ५ ऑगस्टला होणार विस्तार पुन्हा लांबल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.