Type Here to Get Search Results !

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याने केली आत्महत्या!



जालना: जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील वडीकाळ्या या गावात एका शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली. पती-पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  


याबद्दल अधिक माहिती अशी कि, संजय ढेबे (वय 45) आणि संगीता ढेबे (वय 40) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. सदरील घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.


दरम्यान, एका खासगी बॅंकेचे कर्ज असल्याने ते फेडायचे कसे या विवेचनेतून पती-पत्नीने आत्महत्या केली. असा आरोप मयतांच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी गोंदी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies