मुंबई : मुंबईतील वेस्टन एक्सप्रेस हायवेवर बोरिवली जवळच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी दोन जणांचा बळी घेतला. मृतांमध्ये एक महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली वेस्टन एक्सप्रेस हायवेवर दोघे जण बाईकवरून बांद्राकडून दहिसर चेक नाकाकडे जात होते. संजय नॅशनल प्रा येथील ब्रीजवरील खड्ड्यांमुळे बाईक आदळली आणि दोघेही खाली पडले. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात ट्रक येत होता. या ट्रकने दोघांनाही चिरडले.या घटनेनंतर पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज लागत नाही. त्यामुळे असे अनेक अपघात होतात.