अहमदनगर: 'तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे मद्य धोरण लागू केले, लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात फरक आहे, असे अण्णा हजारेंनी पत्रात म्हटले आहे.
गेल्या काही दिवसापासून दिल्लीतील मद्य धोरणावरुन आम आदमी पक्ष चर्चेत आला आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आता सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे.
या पत्रात ते म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी ऐतिहासिक आणि लोकनियुक्त आंदोलन. त्यात लाखो लोक आले होते. त्यावेळी तुम्ही लोकायुक्तांची गरज असल्याबद्दल मंचावरून मोठमोठी भाषणे दिली होती. आदर्शच्या मनात राजकारण आणि व्यवस्थेचे विचार होते. पण दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही लोकपाल आणि लोकायुक्त कायदा विसरलात. तुमच्या सरकारने महिलांवर परिणाम करणारे, लोकांचे जीवन उद्ध्वस्त करणारे मद्य धोरण लागू केले. यावरून तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात तफावत असल्याचे दिसून येत आहे, असे अण्णा हजारेंनी पत्रात म्हटले आहे.