नाशिक: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता नाराजी नाट्य सुरू झालं आहे. भाजपाकडे जास्त महत्वाची खाती गेल्यानं शिंदे गटात अस्वस्थता असल्याचे सांगितले जात आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, "अखेर खाते वाटप झालं आहे हे महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न कुणाला सांगायचे हा प्रश्नच होता. अजून खूप मंत्री यायचे आहेत. त्यावेळेस खात्यांचं पुनर्वाटप होईल. जे खातं दिल आहे, त्यात काम करून दाखवलं पाहिजे. भाजपकडे जास्त मंत्री आहेत. मुख्य वाटा जर भाजपकडे गेला असेल तर चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. शिंदे गटातील अनेकांनी सांगितलं आम्ही सत्तेसाठी आलो नाही. मग आता कशाला रडता?", असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.