मुंबई: 'पन्नास खोके एकदम ओके, ईडी सरकार हाय हाय' अशा प्रकारच्या घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटावर निशाणा साधला. शिंदे गटातील आमदारांनी त्यांच्या गटात जाण्यासाठी ५० कोटी घेतल्याचा आरोप विरोधकांकडून सतत केला जातो याच पार्श्वभूमीवर ही घोषणाबाजी करण्यात येत होती.तर शिंदे-फडणवीस सरकार तूम आगे बढो, हम तुम्हारे साथ है! अशा घोषणा सरकार मधील मंत्र्यांनी दिल्या.
दरम्यान, आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. याच अधिवेशनाच्या आज सकाळपासून विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यासह सर्व विरोधक विधानसभेच्या पायऱ्यांवरती सरकार विरोधात आंदोलन केले यावेळी विरोधकांनी घोषणाबाजी देखील केली.
तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करत विधानसभेत प्रवेश केला.