Type Here to Get Search Results !

“दिल्लीतून अजूनही सिग्नल मिळालेलं दिसत नाही” मंत्री खातेवाटपावरून ‘यांचे’ मोठे वक्तव्य!



मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तब्बल ४० दिवसानंतर मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारच्या १८ आमदारांचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी पार पडला. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खातेवाटपावरुन चर्चा  सुरु आहेत. परंतु, काही खात्यांबाबत अजूनही निर्णय झाला नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे खातेवाटपावर दिल्लीतूनच शिक्कामोर्तब होणार असून १५ ऑगस्ट नंतरच खातेवाटपाला मुहूर्त मिळणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.



“दिल्लीतून शिंदे-फडणवीस सरकारला अजूनही सिग्नल मिळालेलं दिसत नाही तर पुण्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराजमान झाले, तर त्यांचे स्वागतच आहे”, असे पवार यांनी वक्तव्य केले.


दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी पार पडला. खात्यांबाबत अजूनही निर्णय झाला नसल्याचे चित्र आहे. यावरुन आता  विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही टोला सरकारला टोला लगावला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies