Type Here to Get Search Results !

सेल्फीच्या नादात गमावला जीव; दोघांचा मृत्यू!



चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा-चिमूर मार्गावरील चारगाव सिंचन तलाव परिसरात सेल्फीच्या नादात दोन जीवलग मित्रांनी आपला जीव गमावला. तलावाजवळ सेल्फी घेत असताना एक मित्र पाण्यात पडला, त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्याने पाण्यात उडी घेतली मात्र दोघेही बुडाले.हार्दिक गुळघाने (वय 19) आणि आयुष चिडे (वय 19) अशी मृत्युमुखी पडलेल्या जीवलग मित्रांची नावे आहेत. 



याबद्दल अधिक  माहिती अशी कि,  वरोरा-चिमूर मार्गावरील चारगाव सिंचन तलाव परिसरात ५ मित्र फिरण्यासाठी गेले होते.सिंचन तलाव असलेल्या चारगावलगतच्या शेगाव येथील रहिवासी हार्दिक गुळघाने (19) सेल्फी काढण्यासाठी गेला असताना पाय घसरून तलावात पडला. त्याला वाचविण्यासाठी आयुष चिडे (19) सरसावला. मात्र तोही पाण्यात बुडाला. इतर मित्रांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले होते. 


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 2 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर दोन्ही मृतदेह आढळून आले. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies