मुंबई: विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणी वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण सिंचन घोटाळ्याची फाईल ईडीने पुन्हा उघडली आहे. १९९९ ते २००९ पर्यंत झालेल्या घोटाळ्यातील कागदपत्रे ईडीच्या हवाली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, हजारो कोटी खर्च करुन केवळ ०.१ टक्के सिंचन क्षमता निर्माण झाली, असे ताशेरे त्यावेळे कॅगने ओढले होते. या सिंचन घोटाळ्याबाबात नागपूर खंडपीठात याचिका प्रलंबित आहे. काही दिवसापूर्वी या संदर्भात एसीबीने अजत पवार यांनी क्लिनचीट दिली होती. मात्र उच्च न्यायालयाने या क्लिनचीटवर अद्याप शिक्कामोर्तब केलेला नाही.आता या संदर्भातील चौकशी ईडी पुन्हा सुरू करणार असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने १९९९ ते २००९ पर्यंत झालेल्या घोटाळ्यातील कागदपत्रे ईडीच्या हवाली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा पुन्हा एकदा लागू शकतो, अशी माहिती समोर येत आहे.