मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर आज 'सुप्रीम' सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामार्फत कोर्टात एकूण 5 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
आजची सुनावणी सुरू होण्यापूर्वी शिंदे गटाकडून बुधवारी रात्री उशीरा वकील हरीश साळवे यांनी काल रात्री उशीरा कोर्टात काही मुद्दे सादर केले आहेत. आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असतो. तो अधिकार कोर्टाला नाही असा मुद्दा शिंदे गटाकडून मांडण्यात आला आहे. कोर्ट आमदारांना अपात्र ठरवू शकत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने केलेली ही याचिकाच अर्धवट आहे. असा मुद्दा शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी कोर्टात मांडला आहे.
दरम्यान, आमदारांविरोधात अपात्र प्रकरण प्रलंबित असले तरी ते विधानसभेचे सदस्यचं असतात. त्यांना सर्व अधिकार असतात असा युक्तीवादही एकनाथ शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी केला आहे. दरम्यान, या दाव्यावर आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.