जळगाव - शिंदे-फडणवीस सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. मात्र, अद्यापर्यंत या सर्वांना खातं वाटप करण्यात आलेले नाही. अशातच मंत्रिमंडळात पहिल्याच विस्तारात स्थान देण्यात आलेल्या भाजपच्या गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला आहे.
गुलाबराव पाटील, मी स्वतः ओबीसी आहोत, त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसींवर अन्याय केला हा खडसेंचा आरोप चुकीचा आहे. तुम्ही आहेत म्हणजे सगळे ओबीसी असं समजण्याचं कारण नाही, आपण थोडं शांत रहा, तू तू मै मै करू नका असा टोला गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानंतर महाजन पहिल्यांदा जळगावात आले यावेळी ते बोलत होते.