हैदराबाद: ११ ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेशातील अन्नमय जिल्ह्यातील रायचोटी येथे एका ५५ वर्षीय महिलेने एका महिलेचे शीर घेऊन पोलीस ठाण्यात आली. महिलेने स्वतः पोलिसांसमोर सुनेचा खून केल्याची कबुली दिली. सुबम्मा असे या महिलेचे नाव आहे. ती रायचोटी नगरपालिका हद्दीतील कोठाकोटा रामापुरम भागातील रहिवासी आहे. वसुंधरा असे मृत महिलेचे नाव आहे. ती ३५ वर्षांची होती.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, सुबम्मा तिची सून आणि दोन नातवंडांसोबत राहत होती. त्यांचा मुलगा मरण पावला होता. मुलाच्या मृत्यूनंतर त्यांची संपूर्ण मालमत्ता पत्नी वसुंधरा यांच्या नावावर त्यांनी केला होती. वसुंधरा यांचे एका व्यक्तीसोबत अफेअर असल्याचा सुबम्मा यांना संशय होता. याचा राग सुबम्मा यांना तिच्या सुनेवर यायचा. तिला आपली सर्व मालमत्ता त्याला देईल याची भीती होती. ११ ऑगस्ट रोजी सुबम्मा आणि वसुंधरा यांच्यात काही कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर सुबम्माने आपल्या सुनेवर हल्ला केला, त्यात ती जागीच ठार झाली.
दरम्यान, सुबम्मा यांनी वसुंधरा यांचे शीर घेऊन पोलीस ठाणे गाठले, आणि आत्मसमर्पण केले. पोलिसांनी वसुंधरा यांचा मृतदेह आणि तिचे शीर पोस्टमॉर्टमसाठी पाठवून तपास सुरू केला आहे. त्यानंतर सुब्बम्मा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.