Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील 'या' गावात रक्षाबंधन साजरा करत नाहीत; जाणून घ्या काय आहे प्रकरण!



बुलडाणा : आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधन साजरा केला जात आहे.परंतु, महाराष्ट्रातील बुलडाण्यातील  वानखेड या गावात  रक्षाबंधन साजरा केला जात नाही. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, बुलडाणा जिल्ह्यातील वानखेड नावाचे गाव. या गावात पालिवाल समाज मोठ्या प्रमाणात आहे.आजपासून तब्बल ३३२ वर्षांपूर्वी राजस्थानच्या पाली राज्यातून हा समाज व्यवसायानिमित्त या गावात वास्तव्यास आला आणि तेव्हापासून इकडेच आहे. ३३२ वर्षांपूर्वी पाली राज्यावर मुस्लिम शासकाने हल्ला केला होता व त्या राज्यात मोठा नरसंहार झाला होता. प्रचंड जीवितहानी झाली होती आणि तो दिवस होता श्रावणी पौर्णिमेचा.त्यामुळे  श्रावणी पोर्णिमेच्या दिवशी अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी आपले हजारो वंशज मारले गेल्याने या समाजाकडून रक्षाबंधन साजर केला जात नाही. तर गावातील पालिवाल समाजाचे लोक दरवर्षी एका मंदिरात जमतात व आपल्या पूर्वजांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून "एकता दिन" म्हणून साजरा करतात. 




दरम्यान, या दिवशी गावातील एकही बहीण आपल्या भावाला राखी बांधत नाही. तसेच, घरात गोड पदार्थही ठेवत नाही. हा सण मोहंमद गझनीच्या निषेधार्ह दिन म्हणून ही साजरा करतात. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies