यवतमाळ : राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील शेतकरी पती– पत्नी यांचा वेष्टरच्या पाण्यात पाय घसरून पडून मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह नाल्यातील झाडाला अडकलेले आढळून आले.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, वरुड जहागीर येथील शेतकरी सुभाष राऊत व त्यांच्या पत्नी सुरेखा राऊत हे दररोज जागली करण्याकरिता शेतात जात होते. त्यांचे शेत हे गावातील तलावाच्या पलीकडे असल्याने त्यांना तलाव पार करून जावे लागत होते. रात्री शेतातून जागली करून आज सकाळी साडेआठच्या सुमारास गावाकडे परत येत होते. यावेळी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तलावाला भरपूर प्रमाणात पाणी होते. दोघेही पती– पत्नी तलावाच्या खालच्या ओव्हरफ्लोमधून येत असताना रस्ता पार करतांना पुराच्या पाण्यात पाय घसरला. यात दोघेही एकमेकाला वाचविण्याच्या नादात पुराच्या पाण्यात वाहून गेले. यात दोघे पती पत्नीचा मृत्यू झाला.
दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.