जळगाव: मध्यप्रदेशातून कामानिमित्ताने रावेर तालुका परिसरात अंकलेश्वर ते बर्हाणपूर महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, अंकलेश्वर ते बर्हाणपूर महामार्गावर कर्जोत येथे आज दुपारी भीषण अपघात झाला. खंडवा येथील परीवार कर्जोत येथे कामानिमित्त आला होता. मृत दोघांचे वडील भिक्षा मांगुन आपला जिवन चारिथार्त चालवितात. यात मजूरीचे काम करणारे सख्खे भाऊ ठार झाले. मयत झालेले सुनिल नारायण हरिजन (वय ३५) आणि अनिल नारायण हरिजन (वय २३) हे या भीषण अपघातात ठार झाले असून दोघांचे लग्न झाले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस ग्रामीण रुग्णालयात पोहचले असुन रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.