Type Here to Get Search Results !

“बरं झालं ते गेले...”: उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका!



मुंबई: आज शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रीत काम करणार आहेत. हे सांगण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे सौरभ खेडेकर, सुभाष देसाई यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत बोलतना उद्धव ठाकरे यांनी भाजपसह एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला. 

असंगाशी संग असण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री असलेलं बरं असं काल मुख्यमंत्री म्हणाले होते त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचं जाऊद्या काही विचारु नका, शिवाय बरं झालं ते गेले, कारण माझा असंगाशी संग गेला असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies