नागपूर: मोदी सरकारला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भीती वाटते, हा या शतकातला सर्वात मोठा विनोद असल्याचे वक्तव्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
'ऑपरेशन लोटस'ची तुलना थेट अल -कायदासोबत सामनामधून करण्यात आली आहे, याबाबत मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'सामना' हे वर्तमानपत्र नाही तर एका पक्षाचं पॅम्पलेट आहे. हे पॅम्पलेट फक्त एका पक्षाचे विचार मांडत असते. राजकीय टीका करण्यासाठी सामनाचा उपयोग असून सामनाला जनतेच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही.'
ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भीती मोदी सरकारला वाटते असं म्हणतात तो या शतकातला सर्वात मोठा विनोद आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. यावेळी त्यांनी राज्य सरकारने केलेली कामे देखील सांगितली, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मदत देण्याची घोषणा केली आहे.