पुणे: काल पुण्यातील कात्रजमध्ये शिंदे गटाचे आमदार, माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'गाडीवर दगड मारून पळून जाणे म्हणजे मर्दुमकी नाही. हा भ्याड हल्ला आहे. कायदा सुव्यवस्था पालन करण्याचे काम सरकारचे आणि पोलिसांचे आहे. ज्यांनी हे केले आहे, त्यांच्यावर पोलीस कारवाई करतील, चिथावणी देण्याचे काम कोणी करत असेल तर पोलीस कायदेशीर कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.