मुंबई:आज खरी शिवसेना आमचीच असा दावा करणारे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना - भाजप युती सरकारला जनतेचा कौल मिळाला आहे, शिवसेना - भाजप युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना - भाजप युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार, असे शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
तसेच, एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये पोस्ट केलेल्या ग्राफिक्समध्ये पक्षनिहाय ग्रामपंचायत निकालांचा उल्लेख केला आहे. कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायती मिळाल्या हे त्यातून सांगितले आहे. त्यात शिवसेना ४० आणि उद्धव ठाकरे गटाला २७ ठिकाणी विजय मिळाल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे खरी शिवसेना आमचीच असा दावा एकनाथ शिंदेंनी केल्याचे दिसते आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना - भाजपा युती सरकारला जनतेचा कौल...
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 6, 2022
शिवसेना - भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना - भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार... pic.twitter.com/2Y72CAFuSy
दरम्यान, ट्विट करताना एकनाथ शिंदे यांनी पोस्टमध्ये सोबत जोडलेल्या ग्राफिक्स पोस्टमध्ये उद्धव ठाकरे गट असा उल्लेख केला. त्यामुळे शिवसेना ही आमचीच असल्याचा दावा त्यांनी या ट्विटद्वारे केल्याचे बोलले जात आहे. सध्या या ट्विटची जोरदार चर्चा होत आहे.तसेच खरी शिवसेना नेमकी कोणाची?, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.