मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वाच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. पक्षांना आहे त्या स्थितीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी खंडपीठ स्थापन केले जाणार असल्याचे न्यायालयाने निर्देश दिले आहेत.
तसेच, न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागासवर्गीय आयोगाने शिफारस केल्यानुसार ओबीसी आरक्षणास परवानगी दिली होती, ३६७ संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू केले जाऊ शकत नाही, जेथे निवडणूक प्रक्रिया आधीच अधिसूचित करण्यात आली होती, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.