नवी दिल्ली: पीएम किसान योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक असून यासाठी 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत संबंधित लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही, तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे.
ई-केवायसी प्रमाणीकरण करण्याची ऑनलाईन प्रक्रिया खालीलप्रमाणे:
• PM किसान https://pmkisan.gov.in/ च्या अधिकृत वेबपेजला भेट द्या.
• पेजच्या उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या eKYC पर्यायावर क्लिक करा.
• आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड एंटर करा आणि सर्चवर क्लिक करा.
• आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
• 'ओटीपी प्राप्त करा' आणि एंटर करा
दरम्यान, सर्व तपशील योग्यरित्या एंटर केल्यास आणि शिफारसीशी जुळल्यास, eKYC पूर्ण केले जाईल. ते पूर्ण न झाल्यास, ते अवैध म्हणून चिन्हांकित केले जाईल. असे झाल्यास संबंधित लाभार्थीने स्थानिक आधार सेवा केंद्राशी संपर्क साधावा.