नवी दिल्ली : महाराष्ट्रात नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला हरित लवादाने दंडात्मक कारवाईचा दणका दिला आहे.लवादाने कचरा व्यवस्थापनातील महाराष्ट्र सरकारच्या अपयशावर बोट ठेवत तब्बल 12 हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारची चिंता वाढली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) महाराष्ट्र सरकारला 12,000 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे. हरित खंडपीठाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र सरकार घन आणि द्रव कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरले आहे.