Type Here to Get Search Results !

“....पण ‘हा’ बैल 25 वर्ष झाले बसलाय, याला बदला” : ‘यांची’ राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका!



साताराः 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील घराणेशाहीवर जोरदार टीका केली. 



आमदार जयकुमार गोरे म्हणाले, “एखादा बैल औताला बसलो तर आपण काय करतो, बाजारात नेतो नं? असा बैल अपशकुनी आहे, असं आपण म्हणतोय. पण हा बैल 25 वर्ष झाले बसलाय, याला बदला, तसेच,  रामराजेंच्या घरातच सर्व पदे असून आता ही स्थिती बदलली पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता आमदार जयकुमार गोरे यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies