Type Here to Get Search Results !

“300 रुपये देऊन लोक आणले असते तर....”; अतुल सावेनी दिले विरोधकांना प्रत्युत्तर!



मुंबई: पैठण येथे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. या सभेला प्रचंड जनसमुदाय जमला होता. या सभेनंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी 300 रुपये देऊन या सभेला गर्दी जमवण्यात आल्याचा आरोप केला. त्या आरोपाला मुंबईत मंत्री अतुल सावे यांनी  प्रत्युत्तर दिले आहे.



मंत्री अतुल सावे म्हणाले, “पैसे देऊन लोकांना आणल्याचा आरोप अत्यंत खोटा आहे. 300 रुपये देऊन लोक आणले असते तर पाच तास लोकं कशाला थांबतील असा सणसणीत प्रश्नही त्यांनी विरोधकांना केला. तसेच, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच ते टीका करत असल्याची टीका भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies