पुणे : राज्यात पुढील चार ते पाच दिवस विजांच्या कडकडटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुण्यातील हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
माहितीनुसार, पुढील चार-पाच दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यात दुपारनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सध्या होत असलेला पाऊस हा परतीचा पाऊस नाही. तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या स्थितीमुळे हा पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.