मुंबई: रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळ आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. या सभेला शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की '50 खोके एकदम ओके हे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात प्रत्येक घरात गेलेलं आहे. कारण, त्यांना माहिती आहे त्यांना हे पटलेलं आहे की स्वत:ला 50 खोके आणि महाराष्ट्राला धोके अशीच परिस्थिती या आमदारांनी केली आहे'.
तसेच, पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की 'महाराष्ट्रात खोके सरकार स्थापन होऊन जवळपास अडीच ते तीन महिन्यांचा कालावधील उलटला. मात्र, तरी देखील हे सरकार एक सुद्धा असं काम ठळकपणे दाखवू शकलं नाही की ते आम्ही केलेलं आहे, असा टोलाही आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकार वर केला आहे.