नवी दिल्ली :देशात उद्यापासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून देशात मोबाईलधारक 5G चं धुमशान अनुभवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये 5G सेवेचे उद्धघाटन करणार आहेत. IMC चे आयोजन 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत होत आहे.
5G नेटवर्क हे पाचव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते. हे मोबाईलचे तंत्रज्ञान आहे. यामध्ये 3 फ्रिक्वेंसी बँड आहेत. लो, मीडियम आणि लार्ज से फ्रिक्वेन्सी बँड असतात. 5G नेटवर्कमुळे वापरकर्त्यांना इंटरनेट स्पीड आणि चांगली कॉलिंग सेवा मिळेल.
4G च्या तुलनेत 5G नेटवर्क 20 पट गतीने काम करेल. 5G नेटवर्कमुळे विविध क्षेत्रात जबरदस्त बदलाव दिसून येतील. ही एक प्रकारे नवीन डिजिटल क्रांती आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात मोठा बदल घडून येईल.5G सेवा उद्यापासून देशातील काही भागात सुरु होत आहे.
दरम्यान, आशियातील इतर देशाच्या मानाने, भारतात मोबाईल डेटा सर्वात स्वस्त आहे. डाटा प्लॅन महाग झाले असले तरी इतर देशांच्या मानाने या किंमती अजूनही वाढलेल्या नाहीत. देशात स्वस्तात डेटा प्लॅन मिळत आहे.