नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये विशेष बंदोबस्तात सोडले. यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विट करत निशाणा साधला आहे. 8 चित्ते आले, पण 16 कोटी नोकऱ्या का आल्या नाहीत, तसेच, पंतप्रधानांनी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण केले नाही, असा आरोप देखील राहुल गांधींनी यावेळी केला.
दरम्यान, 8 चीते तो आ गए, अब ये बताइए, 8 सालों में 16 करोड़ रोज़गार क्यों नहीं आए? युवाओं की है ललकार, ले कर रहेंगे रोज़गार। असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.