नवी दिल्ली: आशिया चषक स्पर्धेत भारताने हाँगकाँगवर ४० धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने हाँगकाँगसमोर विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या विजयासह भारताने सुपर-४ मध्ये आपले स्थान कायम केले आहे. भारताच्या आजच्या विजयाचे खरे शिल्पकार सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली ठरले.
दरम्यान, भारताने दिलेल्या १९३ धावांचे लक्ष्य गाठताने हाँहकाँग संघाची दमछाक झाली. मात्र हार न मानता हाँगकाँगने समाधानकारक खेळी केली.