मुंबई: राज्यात येत्या ५ दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उद्यापासून मुंबई ठाणे परीसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, आता हवामान विभागाने आणखी येत्या ५ दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.