Type Here to Get Search Results !

“...यासाठी अमित शहा मुंबईत आलेत”: नाना पटोलेचा अमित शहावर हल्लाबोल!

 


मुबंई: भाजप राहुल गांधी यांना ट्रोल करत आहे, पण जनता महागाईवरून भाजपला ट्रोल करत आहे. आज भय आणि भूक हा महत्वाचा विषय असून भारतात किती लोक जोडले जातात हे येत्या काळात दिसेल. भाजप परिस्थितीनुसार आपली भूमिका बदलत असतो. ते फक्त राजकारण करू पाहत आहेत असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत केले.


पुढे बोलताना पटोले म्हणाले, 'भाजप हा संविधानीकतेला न माणणारा देश आहे. महामहिम हे भाजपसाठी काम करतात. महाराष्ट्रातील मराठी माणसाला शिव्या देणं, थोर महात्म्यांची अवहेलना करणं हे लोकांना दिसत आहे. लोकशाहीमध्ये जनता ही महत्वाची आहे आमदारांना विकत घेऊन सत्ता आणली त्याचा उत्सव करायला शहा मुंबईत आले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies