पुणे : पुण्यात काँग्रेसच्या मंथन शिबीरात बोलताना नाना पाटोले भाजपवर आरोप व टीका केल्या आहेत.
ते म्हणाले, “भारतीय जनता पार्टी जवळ भ्रष्टाचाराचा खूप मोठा पैसा जमा झाला आहे. आपले पैसे काढून दोन उद्योगपती आणि दोन नेते असे चौघे मित्र हे पैसे वाटून घेतात. भय आणि भ्रष्टाचार करून लोकशाही विकत घेण्याचे काम या सरकारने केले असल्याचा आरोपही नाना पाटोले यांनी केला.
तसेच ते पुढे म्हणाले, “मी ओबीसी मंत्रालय काढण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे केली तर ते म्हणाले आता मंत्रालय कमी करायचे आहेत मग सहकार मंत्रालय का काढल? ज्या माणसाला सहकार माहिती नाही अशा माणसाला देशाचा सहकार मंत्री केलं म्हणजे आता तुमची वाट लागणार हे निश्चित अस नाना म्हणाले.
मोदीजींनी आपली जात देखील खोटी सांगितली ते ओबीसी नाहीत आणि हे खोटं आम्ही देशासमोर आणुच अशा इशाराही नाना पाटोले यांनी दिला. मुस्लिमांकडील बिर्याणी लपून-छपून खातात. पण बाकी यांना मुस्लिमांकडून काही चालत नाही. भाजप आणि मोदी हे जाती-धर्माचं राजकारण करतात. त्यात फूट पाडण्याचे काम करत आहेत.