नवी दिल्ली: आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या पदरी निराशाच पडली. पण, आता आगामी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी कंबर कसली आहे. सध्या टीम इंडियाच्या निवड समितीने नुकतीच संघाची घोषणा केली आहे. १६ ऑक्टोबर २०२२ ला टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे.
टीम इंडियाचा स्क्वॉडमध्ये रोहित शर्मा (कर्णधार ), के एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिपक हुडा, रिषभ पंत (विकेट किपर) दिनेश कार्तिक (विकेट किपर), हार्दिक पंड्या, आर आश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदिप सिंग.
स्टॅंडबाय प्लेयर्स : मोहम्मद शामी, श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई, दिपक चहर यांचा समावेश आहे.