रत्नागिरीः मुंबई स्फोटांचा दोषी याकूब मेमनच्या कबरीवरून भाजप आणि शिवसेनेदरम्यान चांगलाच वाद चिघळलाय. अशातच आता कोकणातले आमदार भास्कर जाधव यांनी यावरून तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
तुम्हीच याकूब मेमनची बॉडी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिली होती. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी माफी मागण्यापेक्षा आधी भाजपनेच जनतेची माफी मागितली पाहिजे, असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले आहे.
याकूब मेमनची कबर असलेली ती जागा खासगी आहे. सरकारी किंवा महापालिकेने तिथे एकही पैसा खर्च केलेला नाही. थेट उद्धव ठाकरेंवर आरोप करणे चुकीचे आहे.
तसेच, भाजपनेच काही दिवसांपूर्वी औरंगजेबाच्या कबरीचा विषय उकरून काढला होता. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत म्हणून हळू हळू ते कब्रस्तानकडे जात आहेत, असा टोला जाधव यांनी लगावला.