नागपूर: काल बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधाकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. 'देवेंद्र फडणवीस यांची ही शेवटची निवडणूक आहे', असे ठाकरे म्हणाले होते.
दरम्यान, त्यांच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, 'मी त्यांना एवढेच सांगतो, मुद्दई लाख बुरा चाहे, तो क्या होता है, वही होता है जो तकदीर मे लिखा होता है, तुम्ही २०१९ मध्येही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिन्ही पक्षांवर गंभीर आरोप केला आहे.