सांगली: राज्यपाल पद हे संविधानिक पद आहे. या पदाकडे राजकीय हेतूने वागू नये. मी महाराष्ट्रातला एक नागरिक आणि विधिमंडळाचा सदस्य लोकप्रतिनिधी आहे. सध्या राज्यपाल घेत असलेल्या निर्णयांबद्दल आश्चर्य वाटतं असं माजी मंत्री विश्वजीत कदम म्हणाले.
कदम म्हणाले राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होतं. राज्यपालांना आम्ही आमदारांची यादी पाठवली होती. पण राज्यपालांनी निर्णय घेतला नाही. खरं तर त्यांनी निर्णय घेणं अपेक्षित होतं. दुर्दैवाने हे काही झालं नाही मात्र सरकार बदलल्यामुळे लगेच निर्णय होतो हे आश्चर्यकारक आहे असे कदम यांनी वक्तव्य केले.