मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने सचिवांना देण्यात आलेले विशेष अधिकारी आता संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना दिले आहे. त्यामुळे सरकारच्या कामाचा वेग वाढण्याची शक्यता अधिकारी वर्गाने व्यक्त केली आहे.
तसेच, मंत्रिमंडळ विस्तार उशिरा झाल्याने कोणत्याही खात्याचे काम अडून राहू नये, यासाठी सचिवांना विशेष अधिकार सरकारकडून देण्यात आले होते.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार झाल्यामुळे आणि खातेवाटप देखील पूर्ण झाल्याने शिंदे फडणवीस सरकारने 4 ऑगस्ट रोजी काही अधिकार हे सचिवांना बहाल केले होते. परंतु, त्यामुळे मंत्रालयाचे सचिवालय झाल्याची टीकाही करण्यात आली होती. अखेर आता पुन्हा सचिवांकडील हेच अधिकार संबंधित खात्याच्या मंत्र्यांना बहाल करण्यात आल्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.