Type Here to Get Search Results !

खुशखबर! शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची रक्कम ‘या’ दिवसापासून बॅंक खात्यामध्ये होणार जमा!



औरंगाबाद : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला असून मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे त्याच्या भरपाईपोटी 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदतीचे बदललेले निकष आणि नुकसानीचे क्षेत्र लक्षात घेता ही रक्कम जाहीर करण्यात आली आहे. शिवाय सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार असल्याचे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे. 



दरम्यान, राज्यातील 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 23 लाख 81 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले होते. शिवाय एका शेतकऱ्यास 3 हेक्टरपर्यंतची नुकसानभरपाई मिळणार आहे.तसेच, वेळोवेळी मागणी केली, शिवाय विरोधकांनीही हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात मांडला. अखेर दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies