अमरावती - शहरात लव्ह जिहादच्या प्रकरणाने वातावरण तापले असताना एका आदिवासी तरुणीची लव्हजिहाद मधूनच हत्या झाल्याचा आरोप भाजपचे अनिल बोंडे यांनी केला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, चिखलदरा तालुक्यातील कोटमी येथील 19 वर्षे युवतीला २० जुलै रोजी परतवाडा येथील शाहरुख उर्फ जकिर याने पळवून पुण्याला नेले. गावात पंचायत बसल्यानंतर सदर मुलीला पुण्यात राहत असलेल्या आदिवासी युवकांच्या मदतीने 17 ऑगस्ट रोजी युवतीला गावात परत आणण्यात आले. १८ ऑगस्ट रोजी जाकीर उर्फ शाहरुख त्याच्या मित्राला घेऊन गावात आला व मुलीला आपल्या दुचाकी वर घेऊन गेला. १९ ऑगस्ट रोजी रात्री गावातील विहिरीत या मुलीचा मृतदेह गावकऱ्यांना आढळला.परतवाडा येथील शाहरुख उर्फ जाकीर या तरुणाने आपल्या एका मित्राच्या सहाय्याने माझ्या मुलीची हत्या केली अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी चिखलदरा पोलीस ठाण्यात दाखल केली.
दरम्यान, पोलिसांना या प्रकरणात कुठलीही कारवाई न केल्याने या बाबतची तक्रार खासदार बोंडे यांच्याकडे करण्यात आली. बोंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे.