मुंबई : स्वच्छ महाराष्ट्र अभियान टप्पा दोनचा शुभारंभ झाला. नगरविकास अभियानामार्फत या अभियानाचं काम करत आहेत. नगरविकास विभाग जोरात काम करतोय. 2014 मध्ये पंतप्रधानांनी स्वतः हातात झाडू घेतला. स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली. चळवळ निर्माण झाली. प्रत्येक्षात आता अनुभव येतो. बाकीचीही साफसफाईही करून टाकली. तसंच आपल्याला राज्यातही बाकीची साफसफाई करून टाकायची आहे. राज्यामध्ये काम सुरू झालंय, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
तसेच, मुख्यमंत्री म्हणाले, शहरं स्वच्छ,सुंदर झाली पाहिजेत. प्रशासन चांगलं काम करतंय. मोदी यांनी सांगितलं राज्याचं सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहेत. राज्य आणि केंद्राच्या योजना पुढं न्यायच्या आहेत. आपल्याला चांगली कामं करायची आहेत. आम्ही मोठी कामं करू शकतो. आता राज्यासाठी मोठी कामं करायची आहेत, असे, शिंदे यांनी वक्तव्य केले.