Type Here to Get Search Results !

“...म्हणून राज्याच्या जनतेची उद्धव ठाकरेंनी माफी मागावी”: ‘यांचे’ मोठे वक्तव्य!



मुंबई:  मुंबई बॉम्बस्फोटातला दहशतवादी याकुबची कबर सजवण्यामागे महाविकास आघाडीचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.  उद्धव ठाकरेंनी माफी मागावी, अशी मागणी देखील भाजपने केली आहे.  



चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही याचा निषेध करत आहोत. ज्यांनी हा देशद्रोही गुन्हा केला त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी मागणी करत आहे.  भाजप सरकारला विनंती करत आहे की सरकारने तातडीने सुशोभिकरणं केले त्यांना शोधून काढावे.  हे गंभीर प्रकरण आहे.  उद्धव ठाकरे म्हणाले की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडणार नाही मग हे कसं केलं. याचा शोध लागला पाहिजे.  उद्धव ठाकरे यांनी हे कॉम्प्रमाईज का केलं? तसेच हे सरकार कारवाई करेल पण ही घटना उद्धव ठाकरे यांच्या काळात घडली. त्यामुळे यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई व्हावी. राज्याच्या जनतेची माफी उद्धव ठाकरे यांनी मागावी. मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी अनेक घटनांचे समर्थन केले असे कबूल केलं पाहिजे, असे वक्तव्य बावनकुळे यांनी केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies