मुंबई: सध्या सगळे भाजपचे नेते बारामती दौरा करत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले आणि बारामतीला आले, या बारामतीत धडका मारुन काय होणार आहे का?, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधकांना विचारला आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले, मी माझ्या कामाची सुरुवात पहाटे लवकर उठून करतो. त्यामुळे सलग सातव्यांदा मला बारामतीची लोकं निवडून देत आहेत. लोकांनी मला निवडून दिलं आहे म्हणून मी काम करत असतो. त्यामुळे बारामतीकर मला लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून देतात. काही दिवस झाले अनेक नेते बारामतीला भेट देत आहे. महाराष्ट्रात कूठेही फिरण्याचा अधिकार सगळ्यांना आहे.
दरम्यान, निर्मला सीतारमण या बारामतीचा दौरा करणार असल्याचे बोलले जातंय मात्र त्या कधी येणार माहित नाही मात्र आल्या तर त्यांचं बारामतीत स्वागत करु, त्यांनी कधीही यावं, असेही पवार म्हणाले आहेत.