मुंबई: शिवसेना आणि शिंदे गटाचा संघर्ष चांगलाच पेटला आहे. शिंदे गटाचे रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रामदास कदम यांच्या टीकेला शिवसेना नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, 'रामदास कदम यांनी पातळी सोडली हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय. यापूर्वी नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे रामदास कदम यांच्याबद्दल काय म्हणालेत त्याबद्दल ऐका. त्यानंतर त्यांच्या वर्तमानकाळ सांगेन.
'भूतकाळापासून पक्ष फोडण्याची यांच्या मनात दुही माजली होती. राणे म्हणाले होते की, 'रामदास यांनी मला तोंडावर पाडलं. विरोधी पक्षनेते पद आणि त्याची गाडी मिळाल्यानंतर त्याठिकाणी जाऊन बसले'. फडणवीस म्हणाले होते की, 'रामदास भाई तुमचा पगार किती आणि बोलता किती ? यापूर्वी दोनदा शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाणार होता', असे त्या म्हणाल्या.