नवी दिल्ली: 'महाराष्ट्राला वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प देतो', असे आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात येणारा दोन लाख कोटींची गुंतवणूक असणारा आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन राज्यात राजकारण वाद विवाद चालू आहेत. राज्यातील हा विषय केंद्रात पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची दखल देत मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिले आहे.